55000 शिक्षकभरती साठी प्रशासन सकारात्मक ….!

TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे. माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी 30 हजार शिक्षक भरती करणार असे जाहीर केले आहे. विद्यार्थी संघटना 50 हजार शिक्षक भरती एकाच टप्यात करावी यासाठी आग्रही आहे आणि त्याकरिता त्यांचे मुंबईत आंदोलन सुद्धा सुरू आहे.

अश्यातच एक सकारात्मक माहिती पुढे येत आहे. ती म्हणजे प्रशासकीय स्तरावर 55 हजार शिक्षकभरती साठी प्रशासन सुद्धा सकारात्मक आहे. आता फक्त त्याला सरकार कडून सुद्धा हिरवा कंदील मिळायला हवा. प्रशासनाला माहिती आहे राज्यात शिक्षकांच्या रिक्त जागा अभावी शिक्षणाचा दर्जा खालवत आहे आणि अतिरिक्त भर सुद्धा येत आहे.

आता उरला प्रश्न 55 हजार जागा सरकार भरणार का ? तर नक्कीच भरणार ! कारण उत्तरप्रदेश मध्ये 1 लाख शिक्षकांची भरती होणार आहे, राजस्थान मध्ये 50 हजार , बिहार मध्ये सुद्धा 50 हजार, तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी, विकसित आणि शिक्षणात नेहमी अग्रेसर असणाऱ्या राज्यात का होऊ शकत नाही.

55 हजार जागा भरण्यासाठी फक्त प्रशासन तयार आहे आणि प्रशासनाच्या भूमिकेला सरकारची मान्यता मिळल्यानंतरच ही गोष्ट पूर्णत्वास येऊ शकते. 55 हजार जागांसाठी आपण आता सरकार कडे आपली मागणी लावून धरायला हवी.राजकीय नेत्याना आपली मागणी पटवून द्यायला हवी त्याकरिता सर्व अभियोग्यता धारक शिक्षकांनी एकजुटीने प्रयत्न करुन लढा द्यायला हवा.

Related Posts

शिक्षक भरतीसाठी 27 एप्रिल ला ट्विटर ट्रेंडचे नियोजन , #शिक्षकभरती_55000

देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून…

अखेर पवित्र पोर्टल सुरू झाले…!

अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची…

2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक रिक्त जागा तर नाशिक विभागात सर्वात कमी …

             महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सध्या आधार अपडेशन चे काम सुरू आहे त्यानंतरच 2022-23 साठी च्या रिक्त जागांची माहिती पुढे येईल. आधार अपडेट हे साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊन…

विभागीय शिक्षक भरतीत कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा ….!

TAIT परीक्षेच्या निकालानंतर पवित्र पोर्टल सुरू होण्याकडे आतुरतेने डोळे लाऊन बसलेल्या अभियोग्यता धारकांच्या मध्ये विभागीय भरती नावचे घोडे आडवे आले आहे.त्याला सर्व अभियोग्यता धारकांणी वेळीच घरचा रस्ता…

जिल्हा परिषद शाळेतील विषयानुसार जिल्हावार रिक्त शिक्षक संख्या

2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे आजच्या घडीला राज्यात किमान 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारांची सुद्धा 30 हजार च्या आसपास पदे रिक्त…

TAIT निकालानंतर कोर्टात याचिका कशासाठी ?

TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) चा निकाल मागील आठवड्यात लागला आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अशातच निकाल लागल्यावर कोर्टात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *