TAIT निकालानंतर कोर्टात याचिका कशासाठी ?

TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) चा निकाल मागील आठवड्यात लागला आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अशातच निकाल लागल्यावर कोर्टात निकालासंदर्भात व पुढील पवित्र पोर्टल वरील प्रक्रियेसंदर्भात औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या.

या याचिकेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे की यामुळे भरती प्रक्रिया पुढे जाईल,ह्याही वेळी 2017 प्रमाणे मागचे दिवस पुढे येतील. याचिकेसंदर्भात टीका करताना आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे , त्यानंतरच आपल्या लक्षात येईल याचिका किती महत्वाची आहे.

याचिकेतील प्रमुख मुद्दे –

नॉर्मलायजेशन

याचिकेतील प्रमुख आणि महत्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायजेशन, नॉर्मलायजेशन झाले की नाही या संदर्भात विद्यार्थ्यानी परीक्षा परिषद आणि IBPS कडे पाठपुरावा केला मात्र त्याच्याकडून कुठलीही लेखी माहिती दिली गेली नाही.

गुणांचे नॉर्मलायजेशन जर झाले असेल तर निकालांमधे row स्कोअर दिसायला हवा आणि जर नसेल झाले तर ते का केले गेले नाही. नॉर्मलायजेशन नंतर अनेक विद्यार्थ्यांचे रॅंक सुधारतील त्यामुळे नॉर्मलायजेशन व्हायलाच हवे.

VI बोगस विद्यार्थी

गुणवत्ता यादी मध्ये अनेक अंध विद्यार्थ्याना 150 पेक्षा अधिक मार्क आहेत. त्यामुळे ते संशयास पात्र आहेत. तसेच त्यापैकी अनेक विद्यार्थी एकाच जिल्ह्यातील आहे पैकी काहीची अपंग प्रमाणपत्रे मागील वर्षी तयार झालेली आहे. या सर्व निकषावर काहीतरी गैरव्यवहार झाल्याचे दिसून येते.

त्यामुळे या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे. जेणेकरून खऱ्या अपंग विद्यार्थावर अन्याय होऊ नये

NCTE चे नियम

शिक्षक भरती ही NCTE ने आखून दिलेल्या नियमांतर्गतच व्हायला हवी,कारण आज जर नियमानुसार प्रक्रिया पार पडली नाही तर उद्या अन्याय होणारा प्रत्येक जन कोर्टात जाईल.

यातील एक प्रमुख मुद्दा म्हणजे CTET appear विद्यार्थ्याना शिक्षक भरतीत स्थान न देणे. NCTE नॉर्म नुसार शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (CTET / TET ) पास होणे गरजेचे आहे. TAIT ही शिक्षक भरतीची परीक्षा आहे त्यामुळे तिची पहिली प्राथमिकता ही आहे की शिक्षक पात्रता परीक्षा पास असावी.

तसेच CTET/TET पेपर 2 हा पदवीच्या विषयानुसार पास असायला हवा आणि त्यानुसारच नियुक्ती मिळायला हवी.

TET बोगस विद्यार्थी

2022 मधे TET घोटाळ्यातिल 9500 उमेदवार अपात्र केले होते,त्यांना TAIT परीक्षेत का संधि दिली. पुढे त्यांना पोर्टल वर संधि न देता अपात्र करणे.

Related Posts

शिक्षक भरतीसाठी 27 एप्रिल ला ट्विटर ट्रेंडचे नियोजन , #शिक्षकभरती_55000

देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून…

अखेर पवित्र पोर्टल सुरू झाले…!

अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची…

55000 शिक्षकभरती साठी प्रशासन सकारात्मक ….!

TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे….

2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक रिक्त जागा तर नाशिक विभागात सर्वात कमी …

             महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सध्या आधार अपडेशन चे काम सुरू आहे त्यानंतरच 2022-23 साठी च्या रिक्त जागांची माहिती पुढे येईल. आधार अपडेट हे साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊन…

विभागीय शिक्षक भरतीत कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा ….!

TAIT परीक्षेच्या निकालानंतर पवित्र पोर्टल सुरू होण्याकडे आतुरतेने डोळे लाऊन बसलेल्या अभियोग्यता धारकांच्या मध्ये विभागीय भरती नावचे घोडे आडवे आले आहे.त्याला सर्व अभियोग्यता धारकांणी वेळीच घरचा रस्ता…

जिल्हा परिषद शाळेतील विषयानुसार जिल्हावार रिक्त शिक्षक संख्या

2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे आजच्या घडीला राज्यात किमान 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारांची सुद्धा 30 हजार च्या आसपास पदे रिक्त…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *